मन की बात कार्यक्रमांमध्ये झाडीपट्टी रंगभूमीतील कलाकाराचा विशेष उल्लेख झाल्याचा आनंद : आ. डॉ. देवराव होळी - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

मन की बात कार्यक्रमांमध्ये झाडीपट्टी रंगभूमीतील कलाकाराचा विशेष उल्लेख झाल्याचा आनंद : आ. डॉ. देवराव होळी

दि. २९ जानेवारी २०२३

Vidarbha News India -VNI

मन की बात कार्यक्रमांमध्ये झाडीपट्टी रंगभूमीतील कलाकाराचा विशेष उल्लेख झाल्याचा आनंद : आ. डॉ. देवराव होळी

- आपल्या जनसंपर्क कार्यालयात केले मन की बात कार्यक्रमाचे आयोजन
- आ. डॉ. देवराव होळी यांचे सह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
- नुकतीच पद्मश्री घोषित गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टी रंगभूमी कलाकार परशुरामजी खुणे यांच्या उल्लेखाने झाला विशेष आनंद
- आ. डॉ.देवराव होळी यांच्या पुढाकाराने गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मन की बात कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन

विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नुकतीच पद्मश्री घोषित झालेले परशुराम खुणे यांचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आजच्या मन की बात या कार्यक्रमांमध्ये विशेष उल्लेख केल्याने गडचिरोली 

जिल्ह्याचा मान उंचावला असल्याची प्रतिक्रिया आ.डॉ. देवराव होळी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या प्रजानेवारी संगी केली.

मन की बात या कार्यक्रमाला महेश साबल, मंगेश लाडेकर, महेश पेंड्याल, हेमंत बोरकुटे, रवींद्र हलदार, हरेश निमजे, भाऊजी भोगेकर, बंडू बारसागडे, रणजित हलदर, सत्यरंजन मंडल, प्रकाश दत्ता, अपूर्व मुझुमदार, गणेश हलदर, सुभाष पाल, वेदांत सोमनकर, कार्तिक सरकार, शंकर दास, संजू मंडल, शेषराव कोहळे, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तथा बूथ प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. 
आ. डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथावर मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार गडचिरोली क्षेत्रातील बहुतांश बुथावर व बहुतांश ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला . गडचिरोली जिल्ह्यासारख्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल आकांक्षीत जिल्ह्यातील झाडीपट्टी कलावंत परशुराम खुणे यांना पद्मश्री बहाल झाल्याबद्दल केल्याबद्दल केंद्र सरकारचे त्यांनी आभार मानले. जिल्ह्यातील झाडीपट्टी कलावंतांना सन्मान दिल्याने या जिल्ह्याचा मान संपूर्ण देशात उंचावला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Share News

copylock

Post Top Ad

-->