Vidarbha News India :-
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन...
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*
*चामोर्शी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा* चामोर्शी तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद*
*शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात चामोर्शी तहसील कार्यालयावर मोर्चा*
*कोणतीही पूर्वसूचना न देता कृषी पंपाचे विज कनेक्शन कापणाऱ्या एमएसीबी च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दिली पोलिसात तक्रार*
गडचिरोली*दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ *
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य गोरगरीब जनता व शेतकऱ्यांची प्रचंड लूट चालवली असून शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे हे सरकार असल्याचे प्रतिपादन करीत मोर्चाच्या आंदोलनातील प्रमुख मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथील आयोजित शेतकरी मोर्चास मार्गदर्शन करताना केले.*
*यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्निलजी वरघंटे, भाजपाचे जिल्हा सचिव आनंद भाऊ गण्यारपवार ,बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, पंचायत समितीचे सभापती भाऊरावजी डोर्लीकर,उप सभापती वंदनाताई गौरकर, ओबीसी आघाडीचे महामंत्री भास्करजी भुरे ,आशिष पिपरे चामोर्शी तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे, तालुका महामंत्री संजय भाऊ खेडेकर, भाजपा पदाधिकारी भाऊराव भगत ,अतुल भाऊ भीरपूरकर, बंगाली आघाडीचे नेते सुशांत रॉय ,सौ अनिता रॉय, भाजपाचे ज्येष्ठ नेते जयराम भाऊ चलाख, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक राठी जिल्हा कार्यकारणी सदस्य नीरज रामानुजन वार जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा नरेश भाऊ अल्सावार ,ग्रामपंचायत सदस्य संजय चलाख, किशोर भाऊ गटकोजवार, प्रशांत सावकार पालरपवार, लक्ष्मणजी वासेकर, विकास मैत्र, राजू वरघंटीवार, भाऊजी दहेलकर, वासुदेवजी चिचघरे, विनोद किरमे, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली असून अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त असतांनाच शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युतपुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता खंडित करण्यात येत आहे. धानाला देण्यात येणारा बोनस यावर्षी नाकारण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या कळपा पाण्यात सापडल्याने शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे . माञ अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची घोषणा अथवा भरपाई नाही. २०१९-२० अंतर्गत करण्यात आलेल्या धडक सिंचन विहिरींची थकीत बिल अजुनपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. घरकुल लाभार्थ्यांच्या प्रपत्र “ड” च्या यादीचे चुकीचे निरीक्षण करून अनेक गरजूंना घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत कर्ज माफी घोषित करण्यात आली परंतु त्या घोषित कर्जमाफीनुसार जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी पासून वंचित ठेवण्यात आले आहे . राज्य सरकार शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य लोकांच्या जीवावर उठले असून या सरकारला जागे करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली असून मोर्चातील या मागण्या लवकरात लवकर शासनाने मान्य न केल्यास शासनाच्या विरोधात आणखी मोठा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
