कोकणानंतर विदर्भात पावसाचा राडा! नागपुरात पूर, वीज पडून 11 जणांचा मृत्यू, 1600 घरे उद्ध्वस्त.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

कोकणानंतर विदर्भात पावसाचा राडा! नागपुरात पूर, वीज पडून 11 जणांचा मृत्यू, 1600 घरे उद्ध्वस्त.!

दि. २३.०७.२०२३

Vidarbha News India

Vidarbha Rains : कोकणानंतर विदर्भात पावसाचा राडा! नागपुरात पूर, वीज पडून 11 जणांचा मृत्यू, 1600 घरे उद्ध्वस्त.!

विदर्भ न्यूज इंडिया

नागपूर : कोकणानंतर विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. 13 जुलैपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील विदर्भातील नागपूर विभागात अचानक पूर आणि वीज पडून किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर 1 हजार 600 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, पावसामुळे नागपूर विभागातील अनेक भागात 875.84 हेक्टर शेतजमिनी बाधित झाल्या आहेत. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार नागपूर विभागात 13 जुलैपासून पूर आणि वीज पडून झालेल्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली आणि भंडारा येथे प्रत्येकी तीन, वर्धा आणि गोंदियामध्ये प्रत्येकी दोन आणि चंद्रपूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अहवालानुसार, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये 1,601 घरे आणि झोपड्यांचे नुकसान झाले, तर 39 पशुधनही मरण पावले. पाऊस आणि पुरामुळे नागपूर विभागातील 875.84 हेक्टर शेतजमीन बाधित झाली आहे. नागपूर स्थित प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत अकोल्यात 107.9 मिमी पाऊस झाला. तर यवतमाळमध्ये 24 मिमी, वर्धा 23.4 मिमी, अमरावती 15.6 मिमी, नागपूर 6.7 मिमी, गडचिरोली 3.0 मिमी, गोंदिया 2.2 मिमी, ब्रह्मपुरी (चंद्रपूर) 2.4 मिमी आणि बुलढाणा 2.0 मिमी पाऊस झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा गावात पुरामुळे अडकलेल्या सुमारे 110 जणांची शनिवारी सुटका करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी यवतमाळमधील अनेक भागात पुराचे पाणी ओसरले आणि पावसाचा जोरही कमी झाला. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काटरगाव येथे शनिवारी सुमारे 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. रविवारी जिल्ह्यात पूरसदृश स्थिती दिसून आली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भाच्या इतर भागात ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->