Weather Update : पूर्व विदर्भात पावसाची दडी; वैनगंगा नदीचे पात्र अद्यापही कोरडे.. - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Weather Update : पूर्व विदर्भात पावसाची दडी; वैनगंगा नदीचे पात्र अद्यापही कोरडे..

दि. ०९.०७.२०२३

Vidarbha News India

Weather Update : पूर्व विदर्भात पावसाची दडी; वैनगंगा नदीचे पात्र अद्यापही कोरडे..

विदर्भ न्यूज इंडिया

नागपूर : संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, सध्या काही भागातच पावसाने हजेरी लावली आहे. बऱ्याच भागात पाऊस पडताना दिसत नाही. पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे.

जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पूर्व विदर्भात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. परिणामी विदर्भातील सर्वात मोठ्या वैनगंगा नदीचे गडचिरोली जिल्ह्यातील पात्र अजूनही रिकामेच दिसत आहे. नदीपात्रात सर्वत्र वाळू साठा दिसत असून पाण्याचे मोजके प्रवाह दिसून येत आहेत.

पावसाळा सुरु होऊन एक महिना होऊन गेला तरी अद्याप राज्याच्या अनेक भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा 45 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा विदर्भात दमदार पाऊस होत असल्यामुळे दोघांनी वैनगंगा नदीच्या पुलावर उभे राहून पुराची पाहणी केली होती. मात्र, यावर्षी परिस्थिती विपरीत दिसत असून, त्याच वैनगंगा नदीच्या पुलावरुन पाहिल्यानंतर नदीपात्र बऱ्याच अंशी कोरडा दिसून येत आहे.

उत्पन्नात घट होण्याची शक्‍यता…

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पण ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्या पिकांना आता पावसाची गरज आहे. मात्र, सध्या पाऊस नसल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. शेतकऱ्यांची या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन या पिकावर भिस्त आहे. पण मृग नक्षत्राचा पाऊस बरसला नाही. त्यामुळे यावर्षी उशिरा होत असलेल्या पेरण्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्‍यता आहे.

पेरणीसाठी 75 ते 100 मि.मी. पावसाची गरज
सध्या राज्यात काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पण शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये. जोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करु नये. पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्‍यकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->